Skip to main content

सोलापूरात भीमसैनिक झाला .आक्रमक ; हातातील पेन सोडून वेगळा विचार करावा लागेल, दिला इशारा ; नांदेडचा विषय पेटला

 





सोलापूर : नांदेड जिल्ह्य़ातील बोंडार गावाचे भिम सैनिक अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ सोलापूरातील तरुण तरुणींसह भिम सैनिकानी एकत्र येऊन  अन्याय अत्याचार विरोधी संघटनाच्या माध्यमातून पक्ष विरहित मोर्चा काढण्यात आला. यावेळी भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले, 



अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीने जोर धरला आहे अन्यथा आम्हा युवकांना हातातील पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.


हातात निळे झेंडे, डोक्यावर निळी टोपी, आणि महिला व युवतींनी हातामध्ये फलक घेऊन हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिरासमोरून पासपोर्ट कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला आणि या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यानंतर आपल्या मागण्यांची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या आहेत मागण्या

• अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियातील सदस्यास सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे.

• सदर तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा.

•आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात यावा.

• मारेकऱ्यांबरोबर या कटातील मास्टर माईंड पर्यंत पोहोचण्याकरिताआरोपी आणि सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांचा सीडीआर तपासण्यात यावे.

• अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास पन्नास लाखाची शासकीय मदत जाहीर करण्यात यावी.

•महाराष्ट्रातील सर्व बौद्धांना शस्त्र परवाने देण्यात यावे.


आतिश बनसोडे, उमेश काळे, सचिन वाघमारे, पिंटू डावरे, प्रवीण कांबळे,  रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, वैशाली उबाळे, साधना गायकवाड, अखिल शाक्य, दत्ता सिद्धगणेश, अण्णासाहेब वाघमारे, केरू जाधव, दिपक गवळी, प्रणव पात्रे, अमित गायकवाड, प्रवीण सुरवसे, विनोद जाधव, अविनाश आठवले, बाळासाहेब बनसोडे, विशाल चतुर, विशाखा उबाळे, सचिन कोलते, पंकज ढसाळ, सिद्धार्थ गुड्डे, राजरत्न कदम, उमेश काळे, प्रवीण सुरवसे यांच्यासह संघटना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

सोलापूर : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; 25 हजाराची लाच घेताना सापडले

  सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभारावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा नाराज असल्याचे चित्र होते. शेवटी लाचखोर लोहारच्या हाती बेड्या पडल्याचं. यातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी शिक्षण संस्था असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आठवी ते दहावी वर्ग वाढीसाठी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. तेव्हा यु-डायस प्रणालीतून अर्ज पुणे शिक्षण संचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लोहारचा डाव 28 ऑक्टोबर रोजी साधला गेला असता मात्र ते कोल्हापूरला गेल्याने सोमवार सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावणेसहा वाजता लाचलुचपत विभागाची कारवाई झाली.  तक्रारदार हे तडजोडीअंती ठरलेली 25 हजाराची रक्कम घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यावेळी संबंधित टेबलचा क्लार्क पटेल यांनी तुमच्या तुम्हीभेटा साहेबांना, माणूस बरोबर नाही म्हणून सांगितले, तक्रारदार यांनी लोहार यांच्या केबिनमध्ये जाऊन 25000 ची रक्कम देतात सापळा लावलेल्या अँटी करप्शन विभागाने लगेच लोहार यांना रं

ब्रेकिंग : सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

  सोलापूर : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल 41 बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भर पावसात धोकादायक शाळा तपासल्या ; खिचडी खाल्ली, मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पण दिली...

  सोलापूर - सलग दोन दिवस पडत्या पावसात जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारत असलेल्या शाळेची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्केडेंय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर आज बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. कामात हालगर्जीपणा केल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.  यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळा धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेनंतर आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्केडेंय नगरचे इमारतीची पाहणी मंगळवारी केली. शाळेची झालेली दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेणे बाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सुचना दिल्या. मुलांचा व शिक्षकांचा हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. अंधुक उजेड असलेले शाळेच्या खोलीत सुर्यप्रकाशाच्या उजेडात त्यांनी पाहणी करून शिक्ष