Skip to main content

अरे व्वा ! आषाढी वारीत वारकर्‍यांना मिळणार पिण्यासाठी थंड पाणी ; कसे तर वाचा ही बातमी







सोलापूर :  पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार्‍या भाविक व वारकर्‍यांना यंदा पिण्यासाठी थंड पाणी देण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी प्राथमिक स्तरावर जिल्हा दूध संघ व काही साखर कारखान्यांच्या पदाधिकार्‍यांची चर्चा करून टँकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.


लांबलेला पाऊस, वाढते तापमान आणि एक महिना अगोदर आलेल्या आषाढी वारीमुळे पाण्याविना भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकताच पंढरपूर दौरा करून पालखी मार्ग व मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी करून काही सूचना केल्या आहेत. त्यात पिण्याच्या थंड पाण्याचाही समावेश आहे. यंदा आषाढी वारी एक महिना अगोदर आली आहे. तसेच अजुनही पावसाचा पत्ता नाही. अशा स्थितीत वारकर्‍यांचे पाण्यामुळे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने वारकर्‍यांना पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी थंड पाणी देण्याबाबत विचार करण्याची सूचना प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांना विखे-पाटील यांनी केली होती. 


त्यानुसार ठोंबरे यांनी शुक्रवारी तत्काळ जिल्हा दूध संघ व काही साखर कारखानदारांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन थंड पाणी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली आहे. साखर कारखान्यांनी 10 टँकर द्यावेत व दूध संघाने त्यांच्याकडील प्लॅन्टमध्ये पाणी थंड करून द्यावे, असा प्रस्ताव प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी ठेवला आहे. यासाठी दूध संघ व साखर कारखानदारांनी सकारात्मकता दर्शविली आहे.


पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळा व देहू येथून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघणार आहे. तसेच शेगाव येथून गजानन महाराजांचा पालखी सोहळाही सोलापूरमार्गे पंढरीत दाखल होत असतो. याशिवाय इतर संतांच्या अनेक पालख्या व दिंडी सोहळे सोलापूर जिल्हयात येत असतात. यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पिण्यासाठी थंड पाणी मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सोलापूर : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; 25 हजाराची लाच घेताना सापडले

  सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभारावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा नाराज असल्याचे चित्र होते. शेवटी लाचखोर लोहारच्या हाती बेड्या पडल्याचं. यातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी शिक्षण संस्था असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आठवी ते दहावी वर्ग वाढीसाठी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. तेव्हा यु-डायस प्रणालीतून अर्ज पुणे शिक्षण संचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लोहारचा डाव 28 ऑक्टोबर रोजी साधला गेला असता मात्र ते कोल्हापूरला गेल्याने सोमवार सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावणेसहा वाजता लाचलुचपत विभागाची कारवाई झाली.  तक्रारदार हे तडजोडीअंती ठरलेली 25 हजाराची रक्कम घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यावेळी संबंधित टेबलचा क्लार्क पटेल यांनी तुमच्या तुम्हीभेटा साहेबांना, माणूस बरोबर नाही म्हणून सांगितले, तक्रारदार यांनी लोहार यांच्या केबिनमध्ये जाऊन 25000 ची रक्कम देतात सापळा लावलेल्या अँटी करप्शन विभागाने लगेच लोहार यांना रं

ब्रेकिंग : सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

  सोलापूर : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल 41 बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भर पावसात धोकादायक शाळा तपासल्या ; खिचडी खाल्ली, मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पण दिली...

  सोलापूर - सलग दोन दिवस पडत्या पावसात जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारत असलेल्या शाळेची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्केडेंय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर आज बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. कामात हालगर्जीपणा केल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.  यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळा धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेनंतर आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्केडेंय नगरचे इमारतीची पाहणी मंगळवारी केली. शाळेची झालेली दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेणे बाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सुचना दिल्या. मुलांचा व शिक्षकांचा हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. अंधुक उजेड असलेले शाळेच्या खोलीत सुर्यप्रकाशाच्या उजेडात त्यांनी पाहणी करून शिक्ष